आम्ही सातारकर मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सातारयाचा विकास आणि प्रथम हक्क मराठीचाच बस बाकी आम्हाला काहीच माहित नाही.आणि फक्त सतरयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा, संपूर्ण भारताचा विकास व्हावा हीच ईच्या!! जय महाराष्ट्र!

Tuesday, September 15, 2015

सावलीचा राजा (सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ सावली)


सावली हे सातारा  जिल्ह्यातील एक छोटेसे खेड़े, साताऱ्या पासून २० किलोमीटर अंतरावर असून परळी पासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. १५० उम्बर्त्यांच्या या गावामधे सगळे सण अगदी आनंदाने आणि एकजुटीने साजरे केले जातात. शेकडो वर्षा पूर्वीच्या या गवामधे दोन शिवलिंग आहेत जी परळी भागामधे खुप प्रसिद्ध आहेत कारण दोन शिवलिंग सहसा आढळत नाहीत.

इथे साजरा केला जाणारा एक सण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव. सावली गावामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १९८४ साली झाली. १९९४ साली "सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सावली" ची नोंदणी करण्यात आली.

कालांतराने या गणेशाची प्रसिद्धी होत गेली. आणि आता तो इच्यापुर्ती गणेश म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला सावलीचा राजा, नवसाचा राजा अश्या अनेक नावानी ओळखले जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे कि इथे केलेला नवस पूर्ण होतो. आणि याचा प्रतेय ही खूप भक्तांनी उपभोगला आहे. आपलाही नवस पूर्ण व्हावा याच आशेने पर गावातून अनेक भाविक दर्शनाला सावली येथे येतात. सावलीकर सुद्धा त्यांच्यासाठी सगळ्या सोयी उपलब्ध करून ठेवतात. या सावलीच्या राजाला आता पर्यंत ४ गणराया अवार्ड मिळाले आहेत, त्यामधील ३ अवार्ड तालुक्यात प्रथम क्रमांकाचे आहेत. सातारा तालुका पोलीस आणि सायक्लो उद्योग समुह यांच्या संयुक्त विद्यमाने गणराया अवार्ड अंतर्गत शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याचे ध्येय ठेवले होते आणि सावली गावाने लागोपाठ ४ वेळा गणराया अवार्ड जिंकून त्यांच्या प्रयत्नांचे सोने केले.

सावलीकर भाविकांच्या सोयीसाठी अनेक कार्यक्रम राबवतात. सावलीच्या या राजाच्या महालात मोठ मोठे देखावे उभारले जातात. गावातीलच लहान थोर मंडळी आणि सहकारी मिळून हे देखावे बनवितात. दरवर्षी या देखाव्यातून काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न असतो. समाजप्रबोधन आणि समाजसेवा यासाठी मंडळ नेहमी प्रयत्नशील असते.



आपल्या विद्यार्थ्यांनी हे देखावे बघुन चांगल्या गोष्टी शिकाव्या या उद्देशाने आजूबाजूच्या गावातील (सायली, वेनेखोल, रोहोट) शाळांमधील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांस घेऊन गणेश मंडळास  भेट देतात.


सावलीकर येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या सोयीसाठी तयार असतात. या सगळ्या कामांसाठी येणारा खर्च जास्त असला तरी तो गणरायाला येणाऱ्या देणगीतुन केला जातो. गावातील कोणाकडूनही वर्गणी घेतली जात नाही. याचा अहवाल हि दरवर्षी सदर केला जातो.

गणेश चतुर्थी दिवशी गणरायाचे अगदी वाजत गाजत आगमन होते. अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते. परगावावरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची उत्तम सोय असते. रात्री व्याख्यान, प्रवचन, भजन, अश्या प्रकारचे सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यक्रम असतात. आजूबाजूच्या गावातून ( कुरूळ, वडगाव, सायळी, पेट्री,)  भजन मंडळ येउन आपले कार्यक्रम सादर करतात.

अनंत चतुर्थीला सावलीच्या राजाची भव्य मिरवणूक निघते. मिरवणुकीला परागावावरूनही लोक हजेरी लावतात. मिरवणूक पारंपारिक पद्धतीने दिंडी, भजन करत निघते. मिरवणुकीत गुलाल, डॉल्बी साउंड यांचा सामावेश नसतो. सदर कार्यक्रम हा सातारा पोलिसांच्या नियमानुसार केला जातो.

तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट दया.



मंडळाने आतापर्यंत राबवलेले काही महत्वाचे समाजप्रबोधनाचे कार्यक्रम:
१. लेक वाचवा देश वाचवा
२. एक तरी रुजावूया बी
३. अण्णा हजारे एक आदर्श व्यक्तिमत्व
४. संतांची शिकवण
फोटो:





Thursday, January 19, 2012

किल्ले चंदन वंदन

कथा आणि कादंबरी मध्ये जुळ्या भावा विषयी आपण नेहमीच ऐकत असतो मात्र दुर्गविश्र्वातही अशी जुळी भावंडे आढळतात त्यांच्यापैकीच एक चंदन-वंदन. सातारच्या अलीकडे २४ कि.मी. अंतरावर ही दुर्गजोडी उभी आहे. ऊसाच्या पिकामुळे सधन झालेला हा सर्व परिसर त्यामुळे रस्ते, वीज, एस्.टी. या सर्व प्राथमिक सुविधा गावा गावा पर्यंत पोहोचल्या आहेत. सपाट माथा असल्यामुळे पुणे-सातारा मार्गावरून हे किल्ले सहजच ओळखता येतात. यांच्या पूर्वेस जरंडेश्र्वर कल्याणगड, भवानीचा डोंगर, पश्चिमेस वैराट्गड, पांडवगड. एकीकडे महाबळेश्र्वर प्रांत तर दुसरीकडे सातारा शहर यांच्या सीमेवर हे किल्ले उभे आहेत.

इतिहास :

इ.स. ११९१-११९२ सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले. १६७३ च्या सुमारास शिवरायांनी सातारा प्रांत जिंकला आणि त्याचवेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबत यांना देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे संभाजी राजांच्या कारकिर्दीत सन १६८५ मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्ला खानाने चंदन-वंदन येथे असणा-या मराठांच्या तुकडीवर हल्ला केला. या चकमकीत मोघलांच्या हातात २५ घोडी, २० बंदुका, २ निशाणे, १ नगारा सापडला. पुढे १६८९ पर्यंत हा सर्व परिसर मराठांच्या ताब्यात होता. नंतर मात्र तो मोगलांच्या हातात पडला. छत्रपती शाहुमहाराजांनी सन १७०७ मध्ये पावसाळ्यात हा प्रदेश जिंकून घेतला. पुढे सन १७५२ मध्ये ताराबाईवर लक्ष ठेवण्यास पुरेसा फौजफाटा देऊन बाळाजी विश्र्वनाथांनी या किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली. नंतर हा किल्ला इंग्रजांच्या
हातात पडला.






Monday, August 8, 2011

केंजळगड


केंजळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
केंजळगड
नावकेंजळगड
उंची४२६९ फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीमध्यम
ठिकाणसातारा, महाराष्ट्र
जवळचे गावकोर्ले,वाई,रायरेश्वर
डोंगररांगमहाबळेश्वर
सध्याची अवस्थाव्यवस्थित


केंजळगड हा काही फार नामांकित दुर्ग नव्हे.तो विस्तारानेही विशाल नाही.मात्र,त्याची जागा दोन नद्यांच्या खोरयातील एका पर्वतराजीवर आहे.पलीकडे आहे कृष्णेचे खोरे,तर अलीकडे निरेचे.पलीकडे धोम येथे कृष्णेवर धरण आहे , तर अलीकडे निरेवर देवघर येथे धरण आहे.केंजळला लागुनच आहे. रायरेश्वराचे पठार.त्या पठारावर जाण्यासाठी असलेल्या वाटांची नवे मोठी मजेशीर आहेत. गायदर,गनेशदरा या सोप्या वाटा; परंतु कागदरा,सुणदरा,लोह्दरा,सांबरदरा,वाघदरा ह्या वाटा मात्र अवघड आहेत.केंजळ किल्ल्याकडून रायरेश्वराकडे जाताना वाटेत सुणदरा आहे.सध्या तेथे शिडी लावली आहे.पूर्वी नव्हती.ती वाट चढून रायरेश्वरावर गेल्यावर आपल्याला ती वाट किती अनोखी आहे ते कळून येते.'रायरेश्वर' महादेवाचे देऊळ तेथे आहे.पाठीमागच्या टेकडीवर गेलो,की आपण समुद्रसपाटीपासून १६९६ मीटर उंचीवर येतो.रायगडापेक्षा १ मीटर जास्त ! येथून गोलाकार नजर फिरवली की एक अफाट दृश्य दिसते.

Tuesday, July 19, 2011

कल्याणगड



कल्याणगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान

पुणे - बंगळूर महामार्गावर सातारा शहर वसलेले आहे. सातारा शहराच्या पूर्वेला सह्याद्रीमधील महादेव रांगेचे एक शृंग आलेले आहे. या शृंगातच नांदगिरी ऊर्फ कल्याणगड उठावलेला आहे. पुणे ते सातारा या महामार्गाच्या पूर्वेला कल्याणगड हा किल्ला आहे. सपाट माथा असलेल्या या किल्ल्याच्या माथ्यावर असलेल्या एकमेव वटवृक्षामुळे हा किल्ला दूरूनही ओळखू येतो.